आहे

Submitted by टोच्या on 28 January, 2015 - 06:17

बहुतांश लोक दारावर जो येतो तो भाजीपाला घेतात किंवा तो खरेदी करण्यासाठी बाजारात किंवा मंडईत जावे लागते. बहुतांश वेळा हा भाजीपाला दुय्यम दर्जाचा असतो. कारण प्रथम दर्जाचा माल बाजारसमितीतून इतर राज्यांत किंवा परदेशांत जातो. त्यामुळे जो मिळेल, तोच भाजीपाला बहुतेकांना खावा लागतो. यासाठी माझ्या डोक्यात गेल्या सहा-सात वर्षांपासून शेतकऱ्यांकडून घेऊन ताजा भाजीपाला ग्राहकांना घरपोच देण्याची कल्पना आहे आणि यात जम बसल्यास हाच व्यवसाय पुढे वाढविण्याची इच्छा आहे. सध्या माझ्याकडे अर्धा दिवस वेळ असतो. पुढे मी पूर्णवेळ त्यात उतरण्याचे ठरविले आहे. कारण भविष्यात भाजीपाल्याची मागणी कधीच कमी होणार नाही. नाशिकमध्ये याआधीही एका कंपनीने असा प्रयोग सुरू केला आहे. पण लोकांची वाढती संख्या आणि मागणी पाहता यात खूपच स्कोप असल्यासारखे वाटते. भाजीपाल्याची ऑनलाइन किंवा व्हॉट्स अॅपवर माहिती नोंदवून तो घरपोच पोहचविण्याची योजना आहे. असा व्यवसाय याआधी कुणी केला असल्यास त्यातले फायदे, तोटे, धोके काय आहेत, याविषयी चर्चा करता येईल. तसेच या ‌व्यवसायाला पुढे खरेच किती स्कोप आहे, यात आणखी काय नवीन करता येईल याबद्दलही जाणकारांकडून माहिती मिळू शकेल. कृपया यासंदर्भात मायबोलीकरांनी आपले अनुभव शेअर करावेत, सल्ला द्यावा.

Comments